Saturday, May 21, 2011

bhindast karo jo man kahe...

नवीन काहीतरी करायचे असे प्रत्येकाला वाटत असते आणि जो तो आपल्या परीने त्या दृष्टीने प्रयत्न हि करत असतो. मी हि आजकाल ह्याच वेडाने झपाटलो आहे आणि काहीतरी नवीन शोधात निघालो आहे. मला माहित नाही कि मी निवडलेला मार्ग किती सुरक्षित आहे आणि किती मेहनतीचा आहे पण मी ह्या मार्गावर जाण्याकरिता स्वताला तयार केले आहे.मनुष्य स्वभाव म्हणा हव तर पण ह्या अशा वागण्याचा प्रत्येक जण अनुभव घेत असतो आणि आयुष्यात नवीन काहीतरी करायचा ध्यास घेऊन पुढे जात असतो. काही लोक असतात कि जे करत असलेल्या गोष्टीवर समाधानी नसतात आणि दूषण देऊन जे काही करायचे आहे ते हि ती मंडळी करत नाहीत.माझ्या बाबतीत म्हणाल तर आज पर्यंत मी माझ्या आतला आवाजच ऐकत आलोय. कोणी काहीही म्हणो मला जे पटेल रुचेल तेच मी करत आलो आहे.ह्या प्रवासात खूप काही डागण्या देणाऱ्या घटना घडल्या पण त्या तिथेच सोडून मी माझी मार्गक्रमणा चालू ठेवली आहे काही नवीन करायचे म्हटले कि पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे 'लोक काय म्हणतील' ह्याचा आणि जे काही करायची उर्मी मनात आली असेल ती ह्या विचाराने पुरती गळून पडते आणि पुढे आलेल्या संधीचे आपण स्वागत करू शकत नाही. कारण समाजमनाचा घट्ट पगडा आपल्यावर असतो.पण हे सर्व झुगारून जो आपली मार्गक्रमणा करतो त्याला नक्कीच इप्सित साध्य होते आणि त्याचे आयुष्य जगण्याचे सुख त्याला मिळते.

कारण घडणारी प्रत्येक गोष्ट,घटना हि आपल्याच आयुष्यात घडते आहे हा सगळीकडे पसरलेला समज (?) त्याला कारणीभूत असतो पण काहीही असो जर आपल्याला वाटले कि काही करावे तर नक्की करा. हटके असेल तर उत्तमच आणि नसेल तरी उत्तम..... म्हणतात ना.. सब अच्छा हुआ तो अच्छा है नही हुआ तो और भी अच्छा है...

No comments:

Post a Comment