Sunday, November 14, 2010

दिवाळी सहल

काहीतरी नवीन बघायची इच्छा खूप दिवसापासून मनात होतीच ह्या वर्षी दिवाळीला घरात थांबायचे नाही हे मात्र नक्की होते कोकणात जावे ह्या मन्सुभ्यावर पाणी फिरल्यामुळे सुरवातीला जरा मूड ऑफ झाला खरा पण म्हणतात न कि फिरस्त्याला कोणी आडवू शकत नाही तसे काहीसे झाले आणि आम्ही कोल्हापूर,कणेरी,खिद्रापूर मिरज ह्या अतिशय जुनाट आणि लोकांना रस नसलेल्या ठिकाणाची निवड केली.सुरवातीला काही नवीन बघायला मिळेल ह्याची काही खात्री नव्हती त्यातच कुठलाही प्लान तयार नव्हता फक्त जायचे आणि धडकायचे हेच आम्ही ठरवले होते त्याप्रमाणे ४ ता. ला दुपारी निघालो आणि पहिला टप्पा कणेरी मठ हा पार केला. सिद्धगिरी महाराजाचा मठ आणि त्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला परिसर बघता क्षणीच कोणालाही आवडेल असा वाटला. रात्री मुक्काम आणि पेटपूजा ह्याची सोय झाल्यावर जरा हायसे वाटले.रात्री मस्त जेवण झाले आणि आम्ही पथाऱ्या पसरल्या. ह्या मठ मध्ये निशुल्क जेवण आणि मुक्काम ह्याची सोय होते फक्त रात्री बाहेर जाण्याची परवानगी ते देत नाहीत (?) पण एकुणात मुक्काम आणि परिसर फारच शांत आहे. सकाळी उठल्यावर ह्या मठात असलेले पूर्णाकृती पुतळ्यांचे प्रदर्शन डोळयांचे पारणे फेडून गेले. बारा बलुतेदार आणि अलुतेदार आणि पुरण काळापासून सर्व ऋषी मुनी ते रामायणा पर्यंत सर्व प्रसंग मूर्तीरुपात पाहणे हा एक सुंदर अनुभव होता. लंडन ला असलेले मादाम तुसा मेणाच्या पुतळ्यांचे प्रदर्शन पाहिलेल्यांनी हा अनुभवजरूर घ्यावा तरच कळेल कि भारतात ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा पर्कारचा प्रयत्न फारच स्तुत्य आणि अभिनंदनीय वाटला. आजचा आमचा पुढचा मुक्काम हा जरा नवीन ठिकाणी होता आणि ह्या गावी कोणी गेले सुद्धा नव्हते. कोल्हापूर ला पोहचल्यावर महालक्ष्मी चे दर्शन आणि गर्दी टाळून आम्ही आमच्या मुक्कामाकडे कूच केले. जयसिंगपूर मार्गे छोट्या छोट्या वाड्या वस्त्या पार करीत आम्ही मार्गक्रमण करत होतो रात्री आठ वाजता आम्ही खिद्रापूर ह्या गावी पोहोचलो. लक्ष्मिपुजन आणि दिवाळीच्या शुभ संध्याकाळी सर्व गाव प्रकाशात न्हाऊन निघाला होता.दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या गावात असलेले आणि कोणार्क येथील सूर्य मंदिराशी साम्य असलेले शंकराचे मंदिर आणि त्यावरील कोरीव काम पाहून एक वेगळी अनुभूती आम्ही सर्व जनानि अनुभवली. मंदिरावरील कोरीव नक्षी आणि सूर्यमंदिर पाहून तर अक्षरशा धन्य झालो. आजूबाजूला तसा कुठलाही दगड नसताना इसवी सनापूर्वी बांधलेल्या ह्या मंदिराने आम्हाला खचितच आनंद दिला. आणि पूर्ण प्रवास आणि सहल मार्गी लागल्याचे एक समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तीन दिवस आम्ही देह भान हरपून फिरत होतो त्याचे आज चीज झाले आसे वाटत होते. खिद्रापूर हे गाव कर्नाटक सीमेवर असल्या कारणाने इथे कन्नड आणि मराठी ह्या दोन्ही भाषा सर्रास बोलल्या जातात. कृष्ण काठी वसलेल्या ह्या गावाला २००५ साली पुराचा मोठा फटका बसलेल्या आठवणी हा गाव अजूनही मिरवताना दिसतो. जर २-३ दिवस हातात असतील आणि काही तरी नवीन बघायची इच्छा असेल तर ह्या दोन ठिकाणांना भेट दिल्यावर नक्कीच एक नवीन काहीतरी बघितल्याची अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही.

Sunday, August 15, 2010

Life game

Ohh What a life game we all are playing. Everyone has to act on this spacious and beautiful stage of life with every moment and that to again without any creep. All of a sudden we realize, What is our exact role in all this.Its start from our childhood and ends up on our death, till then every one have to perform his or her role in different form,different gate up. Again here we have to maintain relations,friendships,connection and what not but during all this no one knows who is his/her soul mate. everyone actually stamps on people around us. But question is, no one knows the truth of connection with people and friendship.

Also we suffer our relationship from very close one or so called dear one... and that time one has to decide to whom he have to put faith. For me to put faith on any person means giving all that you have but don't expect. Its really hard to digest but believe me this is the rule of life which one has to follow.. HARD TO GULP BUT YOU HAVE TO...

Thursday, June 17, 2010

पश्चातापाचे प्रायश्चित्त

काही गोष्टी नुसत्या ऐकून देखील खूप बरे वाटते. माझेही तसेच काहीसे झाले आहे.माणसाला आपण केलेल्या कृत्य बद्दल घृणा वाटणे आणि त्याने त्याचे प्रायश्चित्त घेणे हे देखील माणूस पणा बद्दल बरेच सांगून जाते आणि तो माणूस आपल्यामध्ये आहे ह्याची जाणीव होते. माणूसच माणसाला छळतो आणि मग केलेल्या कृत्याचे प्रायश्चित्त करू पाहतो. हरकत नाही जे कोणी आसे वागून परत माणसात येतात त्यांना माफ करणे हेच आपले कर्तव्य आहे. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल जर त्यांनाच लाज वाटते आहे हेही नसे थोडके.

जीवनात आपण कळत नकळत खूप गोष्टी करत असतो आणि त्याच्या होणाऱ्या परिणामाची तमा बाळगत नसतो, पण हे करत असताना आजूबाजूचे लोक आपले निरीक्षण करत असतात हे आपण सोयीस्कर विसरतो आणि तिथेच घात होतो. केलेल्या कृत्याबद्दल वाटलेली लाज हीच खूप आहे आणि त्याच्या बद्दल घेतलेल्या प्रायचीत्ताने तर आपण माणूस आहोत हि ओळख नव्याने जगाला होते. आमेन

Wednesday, June 2, 2010

जे जे फुकट ते ते पौष्टिक

खूप दिवसा पासून ज्याची वाट बघत होतो ते लिहिण्याचा आता मला वेळ मिळाला. माझ्या मागील बऱ्याच ब्लॉग मध्ये तुम्ही माणसांच्या नीरनिराळ्या स्वभाव वैशिठ्य बद्दल वाचले असेल. आज मला अजून एका वैशिष्टयाबद्दल सांगायचे आहे. खरतर वरील मथळा वाचून तुम्हाला कळले असेलच मी काय म्हणतोय ते. आपल्या जीवनात खूप काही घडते आणि ते सर्व चालू असताना जर का काही गोष्टी माणसाला विनासायास मिळाल्या कि तो उड्या मारायला लागतो. तसेच काहीसे कुठलीही गोष्ट किवा वस्तू माणसाला फुकट मिळाली कि त्याला कोण आनंद होतो आणि ती गोष्ट जर त्याला जास्त उपयुक्त असेल तर मग बोलूच नका त्याला स्वर्ग दोन बोटे उरला म्हणून समजा.हीच स्तिथी आपण सर्वांनी कधी न कधी अनुभवली असते आणि त्याचा उपभोग हि घेतलेला आसतो हो कि नाही? सांगायचा मुद्दा एवढाच कि मनुष्य स्वभाव हा असाच आहे त्याला तुम्ही कुठलीही गोष्ट उपकाराने द्या तो लगेच स्वीकारतो आणि धन्य होतो. माझ्या मते कुठलीही गोष्ट हि जर महत्प्रयासाने मिळाली कि त्याची किंमत हि आयुष्यभर टिकते किंबहुना त्या वस्तूचे मोल हे चिरकालीन राहते. मी जे काही लिहितो आहे हे तुम्हाला पटते आहे, पण विनासायास मिळालेल्या गोष्टीचा आनंद काही औरच असतो. कदाचित माणसाची हीच वृत्ती आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळते.

Wednesday, April 28, 2010

SHORT LIFE SPAN
Recently I came across to visit crematorium 3-4 times in a month and believe me this was happen first time in my life I visit that place repeatedly. I loss my best friend & Aunty. Quite often, I think about what a short life span we all having and in that we want to do thins larger than life. Every time I visit crematorium always think one day my no. will come and I have to leave this world like all other. No body knows life after death; nobody knows what happen after death to our soul and all this question are still unanswered.
After a death of my beloved friend I was bit panic and started thinking about how it happens to a person whom I met just 2-3 days before and discussed many thing. Means we don’t have death in our hand it will caught you anywhere. Again one thought came in to my mind, then
Why don’t we live our life fullest?
Why not we celebrate each and every moment of our life?
Why we are so possessive about thing which not even belongs to us after death?
Many times I felt we are really poor people in terms of our mind set. We look only things but not the person who is right now with us.
Such a amazing world is this….. I think we are heading to live virtual life rather than real life.

Friday, March 12, 2010

Diwali 2008

दिवाली मधे सुट्टी कुठेतरी बाहेर जाऊन साजरी करायची असे मनोमन ठरवले होते त्याप्रमाणे आम्ही उभयता गोवा येथे जायचे ठरवून बाहेर पडलो. सुट्टी मजेत घालवून आम्ही परतीचा मार्ग पकडला साधारण एक तास ड्राइविंग केल्यावर सावंत वाडी च्या अलीकडे इन्सुली घाटात काही विपरीत झाले आहे ह्याची जाणीव झाली. गुजराती कुटुंब घेउन जाणारी बस घाटातुन साधारण ४० फुट खाली कोसलली होती. त्या मधील मानसाना बराच मुका मार बसला होता काही विव्हलत बसून रडत होते तर काहिना काय करायचे हेच सुचत नव्हते. माझ्या अंगात कुठून बल् आले कोणास ठावुक पण मी गाडीतून उतरून त्याना मदत करायचे ठरवले. माझ्या पाठोपाठ माझी बायको आणि बहीन पण उतरले. आम्ही पुढचा मागचा काही विचार न करता कामाला लागलो. मी तिथे बांधलेला दोर हातात घेउन सुचना द्यायला सुरवात पण केली होती माझे मलाच काही कळत नव्हते. प्रथमोपचार पेटी घेउन आम्ही सर्व जख्मी लोकाना प्राथमिक उपचार करण्यात गुंतलो होतो. बरीच लोक आजू बाजूला फक्त बघ्याची भूमिका घेउन थांबले होते पण मदतीला फार कमी लोक होते. नेहमी प्रमाने पोलिस उशिरा पोचले पण त्यानी लगेच सर्व ट्राफिक बाजूला घेउन मार्ग सुरलित केला. मार बराच लागला आसल्याने व् अपघाताची तीव्रता अधिक आसल्याने जख्मी लोकाना हॉस्पिटल मध्ये हलवने क्रमप्राप्त होते त्यादिशेने सर्व प्रयत्न चालू होते. इतकी वर्षे मी डोंगरात फिरतो आहे त्या सर्व अनुभवाचा आज मला उपयोग होत होता. लहान मुलाना मुका मार बराच लागला आसल्याने तिकडे माझे लक्ष होते.एका गोष्टीचे मला खरच खुप नवल वाटले की माझी बायको आणि बहिन ह्या सर्व घटनेत आपला खारीचा का होइना पण वाटा उचलत होत्या. बरयाच वेळा आपण नुसते रस्त्या वरील आपघात बघतो आणि निघून जातो पण हीच वेळ आपल्यावर पण येऊ शकते ह्याच आपण विचार पण करत नाही.आज मला माझे पण खुप नवल वाटले की इतक्या लाम्ब जायचे आसून सुद्धा मी त्या मदत कार्यात सामिल झालो होतो. स्थानिक पातली वरील बरीच मंडळी जमुन तिथे मदतीला धावली होती आणि त्यांचा झपाटा पण आश्चर्यकारक होता. ह्या सर्व घटनेत मला मात्र आपल्या क्षण भंगुर आयुष्याचे कुतूहल वाटले आणि आजू बाजुच्या लोकांमधला देव पण दिसला जो आपण सर्व जण शोधत आसतो. मी देखिल बर्याच वेळेला नुसता आपघात बघून निघून गेलो होतो पण इथे मात्र मी त्या अपघातग्रस्त लोकाना उपयोगी पडलो ह्याचे समाधान वाटते. पुण्यात आल्यावर मी कोकण मधील पेपर मिलवुन बातमी वाचली पण त्या अपघातात एका मुलाचा मृत्यु झाला हे वाचून मन खिन्न झाले. पण आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या मदतीचा हात मनाला खुप समाधान देऊन गेला.